वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण कदम यांची बिनविरोध निवड
शिरगांव /संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण शंकर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बाळकृष्ण कदम यांनी ३८ वर्षे शिक्षकी पेशात चांगल्याप्रकारे सेवा केली.सन २००१ साली ते वयोमानानुसार शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले.सामाजिक,शिक्षणक्षेत्रात त्यांना काम करण्याची खूप आवड आहे.गावच्या विकासकामत त्यांचे मोलाचे योगदान आहे.सद्या ते वळीवंडे -कदमवाडी नळयोजना समिती अध्यक्ष,वळीवंडे-कदमवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ हितवर्धक मंडळ-वळीवंडेचे खजिनदार,वळीवंडे काँग्रेस गावकमिटीचे माजी अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ म्हणून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांची वळीवंडे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल प.स.देवगड चे माजी सभापती रवींद्र जोगल,नंदू देसाई,वळीवंडे हितवर्धक मुंबई मंडळाचे अध्यक्ष केशवभाई सावंत,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,सरपंच सौ.अर्चना घाडी,ग्रामसेवक,ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.वळीवंडे परिसरात त्यांना सर्वजण आदराने “कदमगुरुजी” असे म्हणतात.मनमिळाऊ आणि मृदूभाषा असा त्यांचा स्वभाव आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)