ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न..!

जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न..!

प्रकाशन: 29 Oct 2021 11:53 AM
वाचन संख्या 34

समाजरत्न पुरस्काराचे झाले वितरण

मसुरे | सौ. प्राजक्ता पेडणेकर : समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्दात्त हेतुने स्थापन केलेल्या जनजागृती सेवा समितीचा प्रथम वर्धापनदिन व समाजरत्न पुरस्कार सोहळा येथील अजय राजा हाॅल येथे उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग श्री ग्रुप संस्था पुणे चे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज,मुंबई महानगरपालिकाच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त सुनिल गोडसे,जाणीव वृध्दाश्रम व जाणीव अन्नछत्राचे संस्थापक मनोज पांचाळ,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड,सिनियर सेल्स मॅनेजर स्टार हेल्थ इन्शुरन्सचे राजेश कदम,कीर्तनकार,प्रवचनकार,आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पुरोहीत हे उपस्थित होते, यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.सर्व प्रमुख पाहुण्यांचे कार्यकारिणीतील पदाधिका-यांनी शाल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आगामी येणा-या नविन वर्षात जनजागृती सेवा समिती अंतर्गत व्यावसायिकांना त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी,त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी,व्यवसायाची विचारांची देवाणघेवाण होईल यासाठी “जनजागृती उद्योग क्रांतीची “घोषणा करण्यात आली.समितीच्या सविव सौ.संचिता भंडारी यांनी वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला.त्यानंतर फक्त बदलापुर येथील विविध क्षेत्रात कार्य करणा-या संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक, संचालक,सचिव,समाजसेवक, पदाधिकारी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते “समाजरत्न पुरस्काराने”गौरविण्यात आले.समाजरत्न पुरस्कार्तींच्या वतीने समता साहित्य अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष दिलीप नारकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता कडुलकर,तेजल तिरपणकर-उकार्डे,प्रदीप जोशी,गणेश हिरवे,श्रुती उरणकर,मिनल गावडे, भावना परब,महेश्वर तेटांबे,आत्माराम नाटेकर,प्रफुल्ल थोरात यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप जामसांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स