आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला होता, त्यानुसार शासनाने आंबा व काजू पिकासाठी नुकसान भरपाई शासन निर्णयाद्वारे मंजूर केली आहे. हे पंचनामे पोर्टल ला अपलोड करण्यात आले आहेत. परंतु अपलोड केलेल्या २४५० शेतकऱ्यांनी ई - केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम प्राप्त झालेली नाही असे समजते आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई - केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी त्यांची ई - केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून आंबा व काजू नुकसान आंबा व काजू भरपाई ची रक्कम आपले बँक खात्यावर जमा होईल असे समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)