भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची रिक्षा दुर्घटनेतील कुटुंबियांना २५ हजारांची मदत.
आचरा | ब्यूरो न्यूज : चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू ही अत्यंत हृदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली. यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू शकत नाही. मन हेलावून टाकणारी अशी ही घटना आहे. अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा भागात कार्यक्रम साजरे न करण्याचा निर्णय भाजप तर्फे घेण्यात आला असून ते कार्यक्रम थांबविण्यात आले असल्याचे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवार, २२ जून रोजी रिक्षा अपघातात मयत चारही कुटुंबाची भेट घेऊन त्यांना पंचवीस हजारांची मदत देवू केली.नारींग्रे येथे झालेल्या भीषण रीक्षा अपघातात आचरा देवूळवाडी येथील संकेत सदानंद घाडी, गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर, रोहन मोहन नाईक आणि पिरावाडी येथील सोनू कोळंबकर या युवकांचे निधन झाले होते. याबाबतची माहिती समजताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवारी सायंकाळी आचरा येथे संबंधित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, राजन गावकर, महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर, मंदार साबारी, पांडुरंग वायंगणकर, राजन पांगे, अजित आचरेकर, विजय निकम, धनंजय टेमकर, रविंद्र घागरे, मंदार सरजोशी, जयंत पांगे, सिद्धार्थ कोळगे, वाडेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)