पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय संरक्षण दलाचे केले अभिनंदन.
मच्छिमारांना केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे तंतोतत पालन करायचे आवाहन.
नियमांच्या चौकटीत राहून तिरंगा रॅली अथवा अन्य कार्यक्रम करायचे असतील तर प्रोत्साहन देणार असल्याची माहिती.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : एका पत्रकार परिषदे द्वारा जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय संरक्षण दलाचे अभिनंदन केले. केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या येणाऱ्या आव्हानांचे, सूचनांचे व नियमांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सैन्यातील कोणत्याही व्यक्तीच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कोणतीही बाब समाज माध्यमांमधून होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग घेऊन नागरिकांनी आपले योगदान द्यावे आणि नियमांच्या चौकटीत राहून तिरंगा रॅली अथवा अन्य कार्यक्रम करायचे असतील तर जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.
किनारपट्टीवरील मच्छीमारांनी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे. ‘आपले सैन्य अभिमान वाटावा अस काम करतेय त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम शब्दापलीकडे जाऊन कृतीतून करावं’ असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)