ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
Jio साठी आव्हान ठरतोय BSNL चा 'हा' प्लॅन, काय आहे ही ऑफर?

Jio साठी आव्हान ठरतोय BSNL चा 'हा' प्लॅन, काय आहे ही ऑफर?

प्रकाशन: 29 Aug 2024 09:36 AM
वाचन संख्या 147

बीएसएनएल देशभरात आपली ४जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं प्रमुख शहरं आणि टेलिकॉम सर्कलमध्ये २५,००० पेक्षा जास्त नवीन ४ जी टॉवर उभारले आहेत. बीएसएनएलला बळकटी देण्यासाठी सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात ८३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून सरकारचा बीएसएनएलचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या दिशेनं असलेली बांधिलकी दिसून येते.

डेटा आणि फ्री कॉलिंगही

बीएसएनएलचा हा नवा प्लॅन दुसरा सिम वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये केवळ लॉन्ग व्हॅलिडिटीच नाही तर भरपूर डेटा आणि फ्री कॉलही मिळतात. या प्लॅनमध्ये पहिल्या ३० दिवसांसाठी कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. यानंतर उर्वरित १५० दिवस युजर्स फ्री इनकमिंग कॉलचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय यात पहिल्या महिन्यासाठी दररोज २ जीबी डेटा चा समावेश आहे. यानंतर ४० केबीपीएस च्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा मिळतो. हा प्लॅन रिलायन्स जिओसारख्या दिग्गजांना आव्हान देऊ शकतो.

बीएसएनएलचा असा विश्वास आहे की हा प्लॅन परवडणाऱ्या प्लॅनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करेल. बीएसएनएलच्या या निर्णयामुळे टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीनं उचललेलं हे पाऊल टेलिकॉम मार्केटच्या डायनॅमिक्समध्ये मोठा बदल घडवून आणू शकतं. हा प्लॅन बीएसएनएलच्या मोठ्या ४जी रोलआऊटमधील एक धोरणात्मक पाऊल मानला जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स