ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव - साळशी मार्गावरील अनेक वळणे बनतायत धोकादायक ; वाहनचालकांत तीव्र नाराजी.

शिरगांव - साळशी मार्गावरील अनेक वळणे बनतायत धोकादायक ; वाहनचालकांत तीव्र नाराजी.

प्रकाशन: 16 Jun 2024 10:58 PM
वाचन संख्या 178

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड
देवगड तालुक्यातल्या शिरगाव – साळशी या मार्गावरील धोकादायक वळणामुळे चालकांना वाहने हाकताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा मार्ग अरुंद असून समोरून येणारी वाहने पटकन दिसत नसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे. शिरगांव – साळशी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६ रस्त्यावर समोरून एखादे अवजड वाहन आल्यावर छोट्या वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत असल्याचे ते सांगत आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी तीव्र चढ – उतार, तसेच नागमोडी वळणे असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. अशावेळी अचानक समोरून एखादे वाहन आल्यास चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. अशावेळी अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील काही ठिकाणी पाणी निचरा होत नाही. तसेच रस्त्याला काही भागात बाजूचीपट्टी सुस्थितीत नसल्याने छोट्या वाहनचालकांना तसेच दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागतात. या रस्त्यावरील अडचणी दूर करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असते. अवजड वाहतूक, तसेच एसटी बस सेवा सुरू असते. अशावेळी समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स