महामार्गावरील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू.!
कणकवली | ब्यूरो न्यूज : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली-रतांबीव्हाळ जवळ आज संध्याकाळी कार व दुचाकीमध्ये अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील महिला ही ५० फुटपेक्षा जास्त फरफटत गेली. या अपघातात धडक देणारा कार चालक त्याच स्थितीत खारेपाटण च्या दिशेने कारसह पळून गेला. अपघातानंतर जखमी महिला अंजली अमित साळवी (३७ वर्षे) रा.शिवाजीनगर कणकवली यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवण असे डॉक्टरांनी स्पष्ट केले . संध्याकाळी ५ ; ४० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
अंजली अमित साळवी ह्या जानवली येथे दुचाकीवरून जात असताना एका दुभाजकाच्या बाजुच्या फाट्यावरून वळत असताना त्यांना कणकवलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. दुचाकी चालक अंजली साळवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना त्वरीत खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून त्या मृत झाल्याचे सांगितले.
याबाबत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक रूपेश गुरव, पो.कॉ. स्वप्निल जाधव, महिला पोलिस सुप्रिया भागवत, भुषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघातात मृत झालेल्या अंजली अमित साळवी ह्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, सासू असे कुटुंब आहे.
फोटो सौजन्य | कणकवली ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)