गालगुंडाची साथ ; मुलांना जपायचे तज्ञ डाॅक्टर वर्गाचे आवाहन.
कणकवली | प्रतिनिधी : गालगुंड तथा गालफुगी हा मुलांमधील संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे पावसाळा किवा उन्हाळा हे ऋतू सुरु होताना या आजाराचा त्रास होतो. सध्या ही साथ डोके वर काढू लागली आहे. सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने मुलांची वेळीच काळजी घ्यावी व प्राथमिक लक्षणे दिसू लागताच तपासणी करून घ्यावा असा सल्ला आरोग्यतज्ञांनी दिला आहे.
गालफुगी किंवा गालगुंड हा आजार संसर्गजन्य असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी हातांची स्वच्छता तसेच उपचार, लस घ्यावी लागते. हा आजार होऊ नये, यासाठी इतर मुलांना दूर ठेवणे गरजेचे असते. तसेच वेळीच उपचार सुरू करावेत असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
सुरुवातीला जबड्याला सूज येते. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसतात. डोकेदुखी, सांध्यातील वेदना, तोंड कोरडे पडणे, सुजलेल्या पॅरोटीड ग्रंथी, ताप, भूक न लागणे किंवा मळमळ तथा अपचन अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत.
गालगुंड हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावे. तसेच लक्षणे आढळल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बाळ ९ महिन्याचे झाल्यानंतर त्याला एमएमआरचा पहिला डोस आणि त्यानंतर ६ महिन्यांनी दुसरा डोस द्यावा लागतो.
गालफुगी किंवा गालगुंड हा संसर्गजन्य आजार असून त्याला ‘मम्प्स’ असे म्हणतात. यात ताप, सर्दी, डोकेदुखी, कान दुखणे, पोटात दुखणे हे त्रास साधारणपणे होतात, या आजाराच्या विषाणूमुळे मेंदूला संसर्ग होऊ शकतो. यासाठी ताप कमी होणे, अधिकाधिक पाणी प्यायला देणे आणि आराम करणे महत्त्वाचे असते. तसेच वेळीच उपचार करावेत असे आवाहन बालरोग तज्ञ डाॅक्टरांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)