बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी..!
भरणी येथील राघो घाडी यांच्या दोन शेळ्या बिबट्याने केल्या फस्त.
शिरगाव | संतोष साळसकर :
कणकवली तालुक्यातील भरणी-घाडीवाडी येथील वस्तीत राघो लवू घाडी यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारण्याची घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. भरणी- घाडीवाडी येथे बिबट्याचा राजरोसपणे संचार सुरू आहे. शेतकरी राघो घाडी यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्यांना ठार मारण्याची घटना घडली. यात त्यांचे सुमारे १६ ते १८ हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनखात्याचे गुडेकर, श्रीमती राठोड, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, अशोक घाडी, तुषार घाडी, नंदू घाडी, किरण मेस्त्री, अनिल बागवे, प्रशांत घाडी आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानीचा करण्यात आला. भरणी घाडीवाडी या परिसरात बिबट्याच्या संचारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचनामा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)