कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा गड अभेद्य.
सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व..
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ व मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा गड अभेद्य राहिला आहे.दोन्ही तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखविला त्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत.
कुडाळ तालुक्यातील बाव,कालेली, पुळास, निवजे, अणाव, गावराई, नेरूर देऊळवाडा, माणगाव, घावनळे, वारंगाची तुळसुली, झाराप, हिर्लोक, आंब्रड, डिगस, पणदूर, पावशी,कुंदे, पडवे, आंबडपाल, कडावल,वेताळ बांबर्डे, मांडकुली, भोयाचे केरवडे, मुळदे, तेंडोली या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ता प्रस्थापित केली आहे.
तर मालवण तालुक्यातील, श्रावण, रामगड, कोळंब, चौके, राठिवडे, बुधवळे कुडोपी, असरोंडी, बांधिवडे, तोंडवळी, वायंगणी, कांदळगाव, रेवंडी, तळगाव, देवली, वायरी, ओवळीये, साळेल, असगणी, खोटले या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)