ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जानवली बौद्ध विकास संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'शाळा प्रवेश दिन' उत्साहात साजरा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जानवली बौद्ध विकास संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'शाळा प्रवेश दिन' उत्साहात साजरा..!

प्रकाशन: 10 Nov 2022 05:12 PM
वाचन संख्या 88

मसुरे | प्रतिनिधी :
विश्वरत्न, बोधिसत्व नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘शाळा प्रवेश दिन’ विद्यार्थी दिवस म्हणून जानवली बौद्ध विकास संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने कणकवली तालुका संघटनेचे बौद्धाचार्य डी.के. जाधव. (फोंडाघाट) यांच्या धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म प्रवचनात वर्षातील बारा महिन्यांच्या पौर्णिमांचे विशेष अतिशय समर्पक शब्दात व सोप्या भाषेत सांगितले. कास्ट्राईब संघटनेचे महासचिव किशोर कदम सर यांनी ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रंथालयासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महामानवांच्या जीवनावर आधारीत १० पुस्तकांचे धम्मदान करणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष दीपक कदम यांनीही उपस्थितांना पौर्णिमा दिनाच्या व विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.माता रमाई महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी काव्य रूपात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व धम्म बंधू आणि भगिनींनी उत्तम प्रकारे सहकार्य व साथ दिली. धम्माचा विचार व धम्माचरण उत्तम प्रकारे करून आपण आपले जीवन दैदीप्यमान करूया असे मनोगत प्रियांका कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली कदम तर प्रास्ताविक संदीप कदम यांनी मांडले. या कार्यक्रमाला अशोक कदम,विलास कदम,संतोष कदम,अनिल कदम,महेश कदम,संदेश कदम,मृणाली कदम,अर्चना तांबे,साधना पवार,चैतन्य पवार,अस्मिता कदम,प्रदीप पवार यांची उपस्थिती होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स