मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवा..!
सौ.शरयू घाडी यांचे मुणगे येथे प्रतिपादन..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
अनेक परकीय आक्रमणे या देशावर झाली परंतु अमृत शक्तीच्या माणसांनी या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. अनेक देशभक्तांच्या त्यागातून, बलीदानातून आजच्या स्वातंत्र्याची आपण फळे चाखत आहोत. आपल्या मनामध्ये सदैव स्वातंत्र्याची, राष्ट्रप्रेमाची भावना जागृत असली पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते, युद्ध कथा या पासून प्रेरणा घेऊन देशभक्ती जागृत ठेवावी असे प्रतिपादन जेष्ठ समाजीक कार्यकर्त्या सौ .शरयू घाडी यांनी येथे केले.
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू .कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्व या विषयी मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनात जागृत ठेवावा असे आवाहन सौ शरयू घाडी यांनी शेवटी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज यांनी केले.
यावेळी शिक्षिका सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, सौ. रश्मी कुमठेकर, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, स्वप्नील कांदळगावकर, झुंजार पेडणेकर, एन. एल. बागवे, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, संतोष मुणगेकर, आदी उपस्थित होते. आभार एन जि वीरकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)