ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कोमसाप मालवण आयोजित राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर....!

कोमसाप मालवण आयोजित राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर....!

प्रकाशन: 23 Apr 2022 08:34 PM
वाचन संख्या 197

चिंदर | विवेक परब : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या वतीने वसुंधरा दिना निमित्त आयोजित चैत्र पालवी या काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. स्पर्धेत श्री. दौलतराव राणे, आचरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे मानकरी वराड येथील सौ.सेजल संतोष परब या ठरल्या तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी कुडाळ येथील सौ.अनघा नेरूरकर या ठरल्या.

Article image
श्री. दौलत राणे
Article image
सौ. सेजल परब
Article image
सौ. अनघा नेरुरकर

विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये पारितोषिक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कविवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनी या स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्पर्धेसाठी निसर्ग कविता हा विषय देण्यात आलेला होता. सध्या निसर्ग चक्रामध्ये अमुलाग्र असा बदल होत चाललेला आहे. पृथ्वी तापायला सुरुवात झाली आहे. कोकणचेही तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार जावू लागलेय. आलेली चैत्रपालवी करपून जाईल की काय ही धडधड निर्माण झालीय. मानव आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ होणे यासाठी महत्त्वाचे आहे. ते अनुबंध पुन्हा निर्माण करणारी आपली कविता असावी असे आवाहन कोमसाप मालवण च्या वतीने करण्यात आलेले होते. या विषयावर वेगळ्या कवीनी आपले साहित्यिक विचार कवितेतून मांडले.

स्पर्धेचे परीक्षण श्री. एकनाथ गायकवाड व श्री रामचंद्र कुबल यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जागतिक वसुंधरा दिन या दिवशी संपन्न झाला. यावेळी श्री. माधव गांवकर व स्वराशा कासले यांनी निसर्ग गीत सादर केले.

“निसर्ग आणि मानव यांचा अनुबंध जपणाऱ्या अनेक कविता या स्पर्धेच्या निमित्ताने सादर झाल्या. निसर्ग आपणास भरभरून देतो. त्याचं ऋण मानवाने फेडले पाहिजे. निसर्गाची जपणूक केली पाहिजे, हा संदेश कवींनी श्रोत्यांना दिला. याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे,” असे उद्गार प्रसिद्ध कवी श्री. रुजारिओ पिंटो यांनी यावेळी काढले.

प्रमुख अतिथी म्हणून श्री. विजय देसाई यांनी सहभागी कवींचे कौतुक केले.
“नानाविध रत्नांची खाण असलेली आपली वसुंधरा ही ईश्वराची एक अतिशय सुंदर अशी कविता आहे. मात्र भौतिक प्रगतीच्या जोरावर मानव वसुंधरेचे शोषण करण्यास निघाला आहे. चैत्रपालवी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागी स्पर्धक व यशवंतांचे कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेचे संयोजन श्री गुरुनाथ ताम्हणकर, श्री अनिरुद्ध आचरेकर आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स