ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात :महेश गुरव

महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात :महेश गुरव

प्रकाशन: 15 Dec 2021 08:32 PM
वाचन संख्या 76

राज्य सरकारचा केला जाहीर निषेध…!

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांमध्ये राज्य सरकारच्या नाकर्तेपणा दिसून आला आहे. राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात एम्पिरिकल डाटा तयार करण्यात वेळकाढूपणा केल्यामुळेच ओबीसींना आरक्षण गमवावे लागले. ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाला राज्यातील महाविकास आघाडीचेच सरकार जबाबदार आहे.ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करत असल्याची टीका भाजपा ओबीसी सेल युवा जिल्हाध्यक्ष,अखिल गुरव समाज महाराष्ट्र राज्य युवा मानद अध्यक्ष महेश गुरव यांनी केली आहे.
राज्य सरकार कडून आतापर्यंत ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्राकडे बोट दाखवण्यात येत होते. आपल्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकार केंद्राकडे दाखवित असलेले बोट कसे खोटे होते हे दिसून आले. मुळात केंद्र सरकारने जो सर्वे केला होता त्याचा डाटा सामाजिक व आर्थिक गणनेनुसार होता. राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला देण्यासंदर्भातील तो डाटा नव्हताच. मुळात सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यसरकारने एम्पिरिकल टाटा तयार करण्याची गरज होती. राज्य मागासवर्ग आयोगाला हा डाटा तयार करण्याचे आदेश देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असता तर आज ओबीसींवर आरक्षण गमावण्याची वेळ आलीच नसती. मात्र दुर्दैवाने राज्यातील महा विकास आघाडी सरकारने ओबीसींच्या आरक्षणाची पुरती वाट लावली आहे,असा टोला महेश गुरव यांनी केला.
जर राज्य सरकारची ही जबाबदारी नव्हती तर आता सुप्रीम कोर्टात तीन महिन्याच्या मुदतीत हा डाटा गोळा करून कार्यवाही करण्याचे आश्वासन कोणत्या मुद्द्यावर दिले गेले. याचाच अर्थ राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारने केलेल्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसींवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. या साऱ्याचा विचार करता ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच्या सरकारची नव्हती असे दिसून येते. त्यामुळे ओबीसींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे,असे आवाहन महेश गुरव यांनी केले आहे.
तसेच ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून पुढील निवडणुकांपूर्वी या संदर्भातील सर्व कार्यवाही पूर्ण करावी व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणीही महेश गुरव यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स