ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यासाठी मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यासाठी मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन...!

प्रकाशन: 15 Dec 2021 05:27 PM
वाचन संख्या 92

मराठा समाजच्यावतीने कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन

पालकमंत्र्यांनी महिन्यात तोडगा काढण्याचे दिलेले आश्वासन अपयशी

कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):कणकवली नगरपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी एक महिन्यात योग्य तो तोडगा काढला जाईल,असे आश्वासन दिले होते.आता महिना होऊन गेला तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच त्या पुतळ्याचे तात्काळ स्थलांतर करावे अशी मागणी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.यावेळी मराठा समाज समाजाचे भाई परब, सुशील सावंत, महेश सावंत,बच्चू प्रभुगांवकर,बबलू सावंत,मनोज हिर्लेकर, संतोष पुजारे,मनोज सावंत आदींसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी लगत एक रस्ता चालू ठेवण्यात आला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तो रस्ता बंद करण्यात यावा व सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक करण्यात यावा.जेणेकरून वाहने सावकाश जातील प्रशासकीय पातळीवर या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.त्यावेळी तहसीलदार श्री.पवार यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मराठा समाजाने केलेल्या मागणी संदर्भात चर्चा करत तातडीने प्रश्न सोडवा अशा सूचना केल्या आहेत.

***********************************************

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स