वागदे ग्रामस्थांना मोबदला मिळण्यासाठी वर्षभर पाठपुरावा केला जातोय....!
माननीय प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची माहिती….
कणकवली | उमेश परब : वागदे येथील ग्रामस्थांना हायवेचा मोबदला न मिळाल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांसोबत आज पार पडलेल्या चर्चेमध्ये प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी वागदे येथील ग्रामस्थांना मोबदला मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
कणकवली ६६ जणांचा निवाडा वर्षभरापूर्वी पाठविलेला आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा व स्मरणपत्रे दिलीत. आपल्याकडे केवळ सहा ते सात जणांचाच निवाडा पाठविणे बाकी असून तो आपण तातडीने पाठविणार आहे. मात्र, निवाडा फास्ट करणे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची जबाबदारी असून ती टाळता येणार नाही. त्यासाठी आमच्यासोबत प्राधिकरणचाही पाठपुरावा हवा. यासाठी कार्यकारी अभियंत्याना बोलावून दोन दिवसांत बैठक लावण्यात येईल. तसेच डायव्हरशनच्या ठिकाणी रस्ता सुरक्षिततेची जबाबदारी हायवे प्राधिकरण व ठेकेदाराची असून ती तातडीने करून अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)