ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
केवळ ४ थ्या षटकांत ऑस्ट्रेलियाला हरवत भारतीय महिलांनी जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक..!

केवळ ४ थ्या षटकांत ऑस्ट्रेलियाला हरवत भारतीय महिलांनी जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक..!

प्रकाशन: 26 Aug 2023 10:20 PM
वाचन संख्या 190

भारतीय पुरुष संघ सुद्धा अंतिम फेरीत पाकिस्तानशी करणार दोन हात ; साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी.

ब्यूरो न्यूज | क्रीडा : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे सुरु असलेल्या या खेळांमध्ये प्रथमच टी ट्वेंटी क्रिकेटचा समावेश करण्यात आला, जिथे भारताच्या महिला संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला.

याशिवाय, भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाने IBSA जागतिक खेळांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. आता भारतीय चाहत्यांना महिला संघानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

मात्र, याआधी IBSA वर्ल्ड गेम्सच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशाप्रकारे साखळी सामन्यात पाकिस्तानला हरवून जेतेपदाच्या लढतीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
IBSA वर्ल्ड गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. दुसरीकडे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ षटकात ८ विकेट गमावत ११४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने केवळ षटकात १ गडी बाद ४३ धावा केल्या, मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय संघाची विजेता म्हणून निवड करण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स