शासनाची फसवणूक पाच जण संपूर्ण निर्दोष…!
मालवण | सुयोग पंडित : शासनाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पडेल ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच रूपाली तानावडे, ग्रामसेवक अनिल कांबळी यांच्यासह पाच जणांची जिल्हा न्यायालयाकडून सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निर्णय घेण्या कामी ॲड परिमल नाईक, प्रकाश बोडस, अशफ़ाक शेख़ यांनी कायदेशीर परिश्रम घेतले.
या दोघांनी शहीद होलसेकर, विश्वनाथ मिठबांवकर व मिथिलेश सुकी यांच्याशी संगनमत करून शासनाची तब्बल ५ लाख ८ हजार एवढ्या रकमेची फसवणूक केली होती. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा दावा जिल्हा न्यायालयात सुरू होता. मात्र सबळ पुराव्याबाबत त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)