<em>देवगड तालुकास्तरिय निबंध स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या मानसी लाड हिचे दैदिप्यमान यश.</em>
शिरगांव | संतोष साळसकर :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देवगड पोलीस स्टेशन ने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला असून या स्पर्धेत आठवी ते दहावी या गटात- माध्यमिक विद्यामंदिर साळशी,ता.देवगड ची विद्यार्थिनी कुमारी मानसी अजय लाड , इयत्ता १० वी ,हिने तालुकास्तरिय या स्पर्धेत निबंध लेखनात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाबाबत देवगड पोलीस स्टेशन कडून स्पर्धकांना लवकरच कळविण्यात येईल. सर्व विजेत्या स्पर्धकांचे देवगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक निळकंठ बगळे साहेब- देवगड, माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे मुख्याध्यापक माणिक वंजारे, स्कूल कमिटी चे चेअरमन सत्यवान सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ व पालक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादिंनी प्रथम क्रमांक प्राप्त मानसी लाड हिचे व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम साटम या दोघांचे हार्दिक अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)