ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
काळशात दुहेरी अपघात...! (ब्रेकिंग)

काळशात दुहेरी अपघात...! (ब्रेकिंग)

प्रकाशन: 27 Jul 2022 11:48 AM
वाचन संख्या 365

कुडाळ चौके मार्गावरील अपघाताचे भयसत्र सुरुच..!

चौके | अमोल गोसावी :
चौके धामापूर कुडाळ मार्गावर गेले काही दिवस अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवार दिनांक २७ जुलैला सकाळी ८ वाजता चौकेच्या दिशेने जाणाऱ्या GA 09 – V – 9123 या भरधाव डंपरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअर च्या समोरील रस्त्याकडेच्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. त्याचवेळी या डंपरच्या मागाहून येणाऱ्या GA 09 – U – 5123 या डंपरचेही वेगावर नियंत्रण न राहिल्याने तो डंपर पोलला धडकलेल्या डंपरला मागून आपटला आणि याठिकाणी दुहेरी अपघात घडला.

Article image


सदर अपघातात विद्युत पोलचे चार तुकडे झाले आणि वीजवाहिन्या तुटून वीज वितरणचे नुकसान झाले आहे. तर दोन्ही डंपरच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले आहे. परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
वीज वितरण कर्मचारी आणि ठेकेदार यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले
दरम्यान चौके धामापूर कुडाळ मार्गावर कुठेही गतीरोधक नसल्यामुळे आणि भरधाव वाहनांच्या खास करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या तसेच इतर वाहनांच्या वेगावर वाहतूक विभागाचे नियंत्रण नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातामुळे कोणाचातरी बळी गेल्यानंतर पोलीस प्रशासन जागे होणार का असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स