रत्नागिरी-कुणकेश्वर बसफेरी २८ जुलै पासून नियमित सुरु होणार..!
शिरगांव / संतोष साळसकर :
रत्नागिरी राज्य परिवहन मंडळ विभाग मार्फत रत्नागिरी पावस नाटळ मार्गे पटेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड या सागरी मार्गावरुन सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी रत्नागिरी कुणकेश्वर ही प्रवासी फेरी गुरुवार दिनांक २८ जुलै २०२२ पासून कायमस्वरुपी सुरु करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली.
ही प्रवासी फेरी सुरू करण्याकरीता देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांनी विशेष प्रयत्न केले होते. सदर प्रवासी फेरी देवगड बस स्थानकावर १०.३० वाजता पोहोचणार असून कुणकेश्वर येथे ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरता सदर फेरी दुपारी २.३० वाजता कुणकेश्वर येथून व देवगड येथून ३.०० वा वाजता पडेल जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी कडे रवाना होणार आहे तरी या प्रवासी फेरीचा फायदा प्रवाशानी घ्यावा असे आवाहन रत्नागिरी रापन विभाग च्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)