<em>कणकवली बस स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं स्थानकांत धुळीचे साम्राज्य ; डांबरीकरणाची मागणी</em>
कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बस स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं स्थानके, आगारातील डांबरीकरण गेल्या काही वर्षांत उखडून गेले आहे. आज दिवसभरात अधुन मधुन वावटळी उठत होत्या. त्यातून उठणारी धुळ स्थानकांतील प्रवाशांच्या नाका तोंडात जात असल्याने ते हैराण होत होते. धुळीच्या या साम्राज्यामुळे स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षासह सर्वं दुकानांमध्ये मातीचे थर जमा झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वं स्थानकांसह आगारांमधील भागाचे संपुर्णपणे डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जिल्ह्यातील सर्वं बस स्थानकांसह आगारांतील भागाचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांत उखडले गेले आहे. मातीचा थर वर आला आहे. तसेच त्यात खेड्यापाड्यांतून कच्च्या रस्त्यावरून येणार्या एस. टी. गाड्यांवर आणि आत बैठकांवर साचलेल्या मातीची सातत्याने भर पडत असते. वावटळी आल्या नाही तरी गाड्या बस स्थानकात ये जा करीत असताना पाठीमागून मातीची धुळ स्थानक परिसरासह प्रवाशांच्या नाका तोंडात जाते. परिणामी प्रवासी हैराण झाले आहेत. तसेच स्थानकांतील सर्वं दुकानांमध्ये ही धुळ पसरत असल्याने दुकानांतील वस्तू मातीने माखल्या जात आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारीही हैराण झाले आहेत. या धुळीमुळे सर्दी पडसे या आजारांमध्ये वाढ होत आहे. धुळीची अॕलर्जी असलेल्या रुग्णांवर तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.
तरी कणकवली स्थानकासह जिल्ह्यातील सर्वं बस स्थानके, आगारातील भागाचे डांबरीकरण त्वरित करावे, अशी मागणी प्रवासी वर्गांकडून केली जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)