बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर यांचा निबंध ठरला अव्वल..!
‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान’ विषयावर लिहीलेला निबंध...
कणकवली | प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुडाळ येथील शीतल किरण कदम याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून मालवणच्या माधवी लीलाधर तिरोडकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान असा निबंध स्पर्धेचा विषय होता.स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निबंध स्पर्धेला मिळाला. स्पर्धेचे परीक्षण कॉलेज मालवणचे प्राध्यापक नागेश कदम यांनी केली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समता दूतांनी मेहनत घेतली. याबाबत सहभागी व यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)