सिंधुदुर्ग-गोवा नवोदीत काव्य लेखन स्पर्धेत सौ. वर्षाराणी अभ्यंकर ठरल्या अव्वल...!
अध्यक्षस्थानी कवयित्री डाॅ. उर्मिला चाकुरकर व उद्घाटक कवयित्री तथा कोमसाप अध्यक्ष नमिता किर ठरल्या विशेष आकर्षण…!
चिंदर | विवेक परब : आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीराम वाचन मंदिर सभागृहात निमंत्रितांचे १६ वे विभागीय कवयित्री संमेलन संपन्न झाले. सिंधुदुर्ग, गोवा नवोदित काव्य लेखन स्पर्धेत सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांना प्रथम क्रमांकाचे, मृण्मयी बांदेकर यांना व्दितीय तर राधीका तेंडोलकर यांना तृतीय तसेच निता कामत, त्रिवेणी घाडी, अक्षता तांबे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी पैठण येथील जेष्ठ कवयित्री डाॅ. उर्मिला चाकुरकर व उद्घाटक म्हणून रत्नागिरी येथील कवयित्री व कोमसाप अध्यक्ष नमिता किर होत्या. मान्यवर म्हणून अनघा तांबोळी(वाशी), प्रा. दिपा ठाणेकर(ठाणे), अनुराधा म्हापणकर(मुंबई), चित्रा क्षीरसागर(गोवा), प्रा. आदिती बर्वे (गोवा) तर मनिषा पाटील(कणकवली), मधुरा माणगांवकर(मालवण), शालिनी मोहळ(ओरोस), अनुष्का रेवंडकर(कुडाळ), मिनाक्षी अळवणी(बांदा), प्रा. हर्षवर्धिनी सरदार, मंगल नाईक, स्नेहा नाईक या सिंधुदुर्गातील कवयित्री उपस्थित होत्या.आयोजक प्रतिनिधी उषा परब, आरती मासिक अध्यक्ष केशव भागवत, श्रीराम वाचन मंदिर सचिव रमेश बोंद्रे, सावंतवाडी कोमसाप अध्यक्ष ॲड संतोष सावंत उपस्थित होते. संयोजक सहाय्यक डाॅ. अनुजा जोशी, तर संमेलन समिती माधव शिरसाट, मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर व स्मिता परब उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)