ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात काव्यसंमेलनाची रंगत...!

सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात काव्यसंमेलनाची रंगत...!

प्रकाशन: 04 Mar 2022 03:46 PM
वाचन संख्या 32

विशाखा पुरस्कार प्राप्त कवी मोहन कुंभार होते कविसंमेलन अध्यक्ष..!

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सुखासीन जगणाऱ्या माणसाच्या ओठांवर कधी कविता येत नाही. आलीच तर ती खोटी ठरते. जगण्याने छळले तर कवितेचे शब्द धारदार होतात. दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्याला अंतर्बाह्य ढवळून काढून विचार करायला लावते. अस्सल जगणं अनुभवणाऱ्या संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते, असे प्रतिप्रादन कवी प्रा. मोहन कुंभार यांनी केले. सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान, कणकवली आयोजित सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात रंगलेल्या कविसम्मेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

“झुलतो मी आत आत
फुलतो मी आतल्या आत
मी मला रुजवून घेतो
मनाच्याही आत आत”..
अशी संवेदनशील अभिव्यक्ती असलेले विशाखा पुरस्कार प्राप्त कवी प्रा. मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली आणि काव्य पुरस्कार विजेती कवयित्री दिशा पिंकी शेख हिच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कविसम्मेलनात जिल्ह्यभरातील कवींनी उपस्थिती दर्शवून आपापल्या दर्जेदार रचना सादर केल्या. कवी सिद्धार्थ तांबे, श्रेयश शिंदे, कवयित्री कल्पना बांदेकर, कल्पना मलये, मनीषा पाटील, सरिता पवार, चेतन बोडेकर, सुरेश पवार, मधुकर जाधव, मनोहर सरमळकर, श्रीराम चव्हाण, रिमा भोसले, उदय सर्पे, राजेंद्र गोसावी, दिलीप चव्हाण, स्नेहा राणे, साक्षी हर्णे इ. अनेक कवींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. उपस्थित काव्य रसिकांचाही कवींच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले साहित्य अकादमी प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’ कार लक्ष्मण गायकवाड यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कवींना प्रोत्साहित केले. या कवीसम्मेलनाचे यथोचित असे सूत्रसंचालन प्रा. मनीषा पाटील यांनी केले. तर कवी सुरेश पवार यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स