कोरोना संसर्गाची व्याप्ती कमी असलेल्या विभागांतील शाळा होणार सोमवारपासून सुरु..!
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा…!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी काही शैक्षणिक संस्थांनी तसेच पालकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी आहे त्या ठिकाणी या शाळा सुरू करण्यात येणार आहे, असे सौ. गायकवाड म्हणाल्या. त्याची अंमलबजावणी सोमवार दिनांक 24 जानेवारीपासून होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)