गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या तत्काळ सुरू करा
आमदार नितेश राणे यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी
कणकवली / उमेश परब : १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. त्यानिमित्त परंपरेनुसार कोकणातील प्रत्येक घरात बाहेर गावाहून चाकरमानी मंडळी येणार आहेत. कोकण रेल्वेने चाकरमान्यांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात जादा फेऱ्या सुरू केल्या असून शासन स्तरावरही मुंबई, ठाणे, पुणे व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या गणेश भक्तांसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गणेशोत्सवानिमित्त गावागावात येणाऱ्या प्रवाशांसाठी तालुक्याच्या ठिकाणाहून गावातील फेऱ्या नियमितपणे सुरू होणे जरूरीचे आहे. सध्या कोविड १९ मुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी एसटीचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)