कणकवलीत छत्रपती शिवरायांसाठी सर्व नेते एकाच व्यासपीठावर....!
नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना उतरली सत्यात..!
कणकवली | उमेश परब :कणकवली शहरातील महामार्गावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर निर्णय घेण्याबाबत आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, आ.नितेश राणे, आ.वैभव नाईक,माजी आ.परशुराम उपरकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले आहेत.
कणकवली नगरपंचायत भालचंद्र महाराज सभागृहात लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना प्रतिनिधी, कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, मराठा समाज प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुशांत नाईक,जिल्हा प्रशासन अधिकारी जयंत जावडेकर,अबिद नाईक,प्रभारी तहसीलदार प्रिया परब,डॉ.विद्याधर तायेशेट्ये,अशोक करबळेकर,व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुशील सावंत,अण्णा कोदे, समीर सावंत,महेश सावंत,सुशील सावंत,बबलू सावंत,भाई परब,आनंद पारकर,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक अभिजित मुसळे,कन्हैया पारकर,विराज भोसले,महेश तेली,किशोर राणे,मनोज हिर्लेकर,प्रितम म्हापसेकर,अनंत पारकर,राजेंद्र पेडणेकर,शैलश भोगले, राजु राठोड,रिमेश चव्हाण, अजय गांगण,संतोष सावंत,शेखर राणे,अनिल हळदिवे,मिलींद मेस्त्री आदींसह नागरिक उपस्थित आहेत.
नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरपंचायत पदाधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले आहे.आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर मुद्द्यांवर चर्चा सुरुवात झाली आहे.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रस्तावना केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)