ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांनी डाग़ल्या केंद्र व राज्य सरकारांवर आरोपांच्या शब्द तोफ़ा...!

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांनी डाग़ल्या केंद्र व राज्य सरकारांवर आरोपांच्या शब्द तोफ़ा...!

प्रकाशन: 26 Oct 2021 03:06 PM
वाचन संख्या 43

१५०० लोकांचे कोरोनाचे बळी गेलेत?;लोकप्रतिनिधींना जाब जनतेने विचारला पाहिजे…

कणकवली | उमेश परब : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची गरज आहे.जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत.केंद्रात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी “अच्छे दिन लायेंगे” महागाई कम करेंगे ..अशी घोषणा देत सत्तेवर आले.त्याउलट पेट्रोल,डिझेल व गॅसची प्रचंड प्रमाणात महागाई केली आहे.महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे.त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे.त्यामुळेच आपण निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारला पाहिजे.केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राने गेल्या सात वर्षात नोटबंदी व अन्य केलेल्या उपाययोजना असफल ठरल्या आहेत.त्याचे परिणाम आता सुरु झाले असून सर्वसामान्य जनता होरपली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ, मराठवाडा प्रमाणे आत्महत्या ट्रेंड सुरु झाला आहे.त्याचा विचार जिल्ह्यातील सत्ताधारी लोकांनी केला पाहिजे.आहे.जिल्ह्यातील १५०० लोकांचे प्राण कोविड मुळे गेलेत. त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत.शासनाकडे पैसे नसताना मोठमोठ्या घोषणा करतात.त्यामुळेच शिवसेना व कॉग्रेस लोक आंदोलनाची भाषा करताहेत,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला. सध्या राज्यात वानखेडे प्रकरण किंवा अन्य घटना घडवून जनतेचे लक्ष विचलित करुन महागाई व विकासापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेती नुकसान व तोक्ते वादळाची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.कुडाळ महिला रुग्णालयात गेली ७ वर्षे रखडले आहे.मेडिकल कॉलेज लॉलीपॉप दाखवून मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल दाबण्याचा पर्यंत केला आहे.जनतेने निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधींना दारावर आल्यावर जाब विचारला पाहिजे.७ वर्षातील घोषणा व झालेली विकासकामे पाहता विकास झालाच नाही.केवळ घोषणा ठरल्या आहेत,असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स