ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सक्षम आरोग्य यंत्रणांसाठी गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आंदोलन करु ;  न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा इशारा.

सक्षम आरोग्य यंत्रणांसाठी गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आंदोलन करु ; न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा इशारा.

प्रकाशन: 28 Nov 2024 07:34 PM
वाचन संख्या 108

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अनेक अपघातातील अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली येथील आपले बंधू भूषण उदय पार्सेकर या युवकाचा मृत्यू झाला असा आरोप न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केला आहे. तर यापुढे गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी आंदोलन करू असाही इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार अशी वारंवार घोषणा केली जात आहे मात्र या ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच आरोग्याच्या सुविधा सक्षम नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याचा परिणाम अनेक कुटुंबावर होत आहे. नुकतेच न्हावेली येथील आपले बंधू भूषण पार्सेकर युवकाचे अपघातात निधन झाले. या प्रकारचे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक तरुण योग्य वेळी योग्य उपचार सोयी नसल्याने मृत्यूच्या दारात ओडले जातात त्यांना गोवा बांबोळी ठिकाणी न्यावे लागते. तो पर्यंत खूप विलंब होतो याला सुद्धा कारणीभूत येथील कमकुवत आरोग्य सेवाच आहेत असा आरोप अक्षय पार्सेकर यांनी केला आहे. उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे यापुढे तरी लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार प्रशासन राहील असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स