ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ज्येष्ठही ठरले श्रेष्ठ..!

ज्येष्ठही ठरले श्रेष्ठ..!

प्रकाशन: 14 Jul 2024 01:36 AM
वाचन संख्या 190

कर्णधार युवराज सिंगच्या भारतीय लिजंडस् संघाने पाकिस्तानला ५ चेंडू व ५ विकेटसने हरवत पटकावला पहिला वहिला वर्ल्ड चॅम्पियशीप ऑफ लीजंडस् चषक…!

क्रीडा | सुयोग पंडित : इंग्लंड मधील एजबेस्टन ( बर्मिंगहॅम ) येथे ३ जुलै ते १३ जुलै अशा खेळवल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड चॅम्पियशीप ऑफ लीजंडस् टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामन्यात, भारताने पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेटस् व ५ चेंडू राखत विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषक २०२४ मिळविल्यानंतर दहा दिवसांतच भारतीय माजी खेळाडुंनी या विश्व स्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आनंदात दिसत आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या पाकिस्तान लिजंडस् संघाने, निर्धारीत २० षटकात १५६ धावा जमविल्या. कामरान अकमल २६ धावा व शोएब मलिकच्या ४१ धावांच्या बळावर पाकिस्तान संघाने ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारतीय गोलंदाज अनुरीत सिंगने ४३ धावात ३ बळी घेतले.

१५७ धावांचे लक्ष्य समोर घेऊन उतरलेल्या भारतीय लिजंडस् संघाच्या अंबाती रायडूने जलद ५० धावा जमविल्या. त्याला गुरकिरत मान ३४ धावा, युसूफ पठाण ३० धावा व युवराज सिंगच्या नाबाद १५ धावांची साथ लाभली आणि भारताने ५ चेंडू व ५ बळी राखत या स्पर्धा विजयावर कब्जा केला. पाकिस्तानतर्फे अमीर यामीनने २ बळी घेतले.

या स्पर्धेत भारता तर्फे इरफान पठाण, युसूफ पठाण, युवराज सिंग, सुरेश रैना, विनय कुमार, अंबाती रायुडू, राॅबिन उत्थापा या माजी माजी भारतीय खेळाडुंनी स्पर्धेतील विविध सामन्यांवर त्यांची छाप सोडली. अंबाती रायडूला अंतीम सामन्यातील सामनावीर तर स्पर्धेत ३ अर्धशतकांसह २२१ धावा केलेल्या युसूफ पठाणला स्पर्धावीराचा बहुमान मिळाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स