ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्रेयवादाच्या शर्यतीत कोकणातील सर्वांगीण विकास अडकून पडलाय : सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर.

श्रेयवादाच्या शर्यतीत कोकणातील सर्वांगीण विकास अडकून पडलाय : सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर.

प्रकाशन: 06 Apr 2024 08:46 AM
वाचन संख्या 230

केवळ निवडणुका आल्यावर एकमेकांवर टीका करणे योग्य नसून सामान्य कोकणी माणसांनी देखील एकमेकांच्या विचारांचे व्यापक आदानप्रदान करण्याची गरज असल्याचेही व्यक्त केले मत.

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते व माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासाबद्दल एका प्रसिद्धी संदेशाद्वारे भाष्य केले आहे. कोकण ही भूमीच प्रभु परशुरामाने निर्माण केली. तिची रचना, भौगोलिक परिस्थिती याचा गांभिर्याने कुणीही कधीही अभ्यास केला नाही, हेच आम्हा कोकणवासीयांचे सर्वात मोठ दुर्दैव आहे अशी खंत पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही निवडणुका आल्या की एकमेकांच्या नावाने बोंबाबोंब करणे आणि टीका करणे हे आता एक अलिखीत समीकरणच झाल्याने, कोकणी माणसाच्या नक्की काय अपेक्षा आहेत हे जाणून घेताना कोणी दिसत नाही त्यामुळे कोकणातील जनतेलाही आपण दुर्लक्षीतच रहाणार असे वाटू लागण्याची शक्यता असल्याचे मत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

केवळ राजकीय लोकच नाहीत तर प्रत्येक कोकणवासीयाने कोकणातील विविध प्रश्नांविषयी एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे, असे प्रसिद्धी संदेशाद्वारे नमूद करत पेडणेकर यांनी आता पूर्वीप्रमाणेच नाक्या नाक्यावर सामान्य माणुस पूर्वीसारखी व्यापक चर्चा करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ही चर्चा घडत असताना त्यातील मर्म समजण्यासाठी परिणामकारक व्यक्ती घटकांना सामान्य जनतेत मिसळून आणि तेही नकळत फिरावे लागते पण हल्ली तसे होताना दिसत नाही असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक ठिकाणी श्रेय वादाच्या शर्यतीत सर्वांगीण विकास अडकून पडलाय अशी टीका राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली आहे आणि यापुढे तरी कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे अशी अपेक्षादेखील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स