ठराविक भजनी मंडळांना भजनाचे साहित्य देऊन कार्यक्रम उरकण्याचा झाला अट्टाहास ; लाॅटरी लागूनही अजून साहित्य न मिळू शकलेल्या मंडळांची नाराजी.
ब्यूरो न्यूज | सिंधुदुर्ग : जिल्हा परीषद ग्रामपंचायत विभागा अंतर्गत भजनी मंडळांना प्रोत्साहन म्हणून भजनी साहित्य देणे ही योजना राबविण्यात आली. २५० भजनी मंडळांना याची लाॅटरी सुद्धा लागली. लाॅटरी घोषीत झाल्या नंतर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते ५० भजनी मंडळांना ते साहित्य तथा संच वितरीत करायचा कार्यक्रम संपन्न झाला व उर्वरीत २०० भजनी मंडळांना मात्र पुरवठादाराने गणेश चतुर्थीनंतर साहित्य देण्यात येईल असे सांगितले.
जर ते साहित्य गणेश चतुर्थीच्या नंतरच द्यायचे होते तर प्रशासनाने कार्यक्रम उरकण्याचा अट्टाहास केला आहे अशी नाराजी बहुतांश भजनी मंडळांनी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)