'त्या' खेळाडूला बाहेर ठेवून भारत खेळणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका.
क्रीडा | प्रतिनिधी : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनने संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. अश्विनच्या समावेशामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कप दरम्यान अक्षर जखमी झाला होता. आशिया चषकासाठी निवडलेले जवळपास सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळणार आहेत. मात्र, गोलंदाज अक्षर पटेल कांगारुंविरुद्ध खेळणार नाही. या संघात श्रेयस अय्यर याच्या समावेशा बद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण एक सामना खेळल्यानंतर संपूर्ण आशिया चषकात तो जखमी खेळाडू म्हणून संघाबाहेर बाकावर बसला होता.
भारतीय संघ खालील प्रमाणे आहे.
रोहीत शर्मा ( कर्णधार), केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)