ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विजेच्या धक्क्याने ३ शेळ्यांचा जागीच अंत..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विजेच्या धक्क्याने ३ शेळ्यांचा जागीच अंत..!

प्रकाशन: 23 Jul 2023 06:52 PM
वाचन संख्या 304

जिल्ह्यातील वीजेच्या तुटलेल्या तारा व मुक्या जिवांच्या सुरक्षिततेविषयी गांभीर्याने विचार कधी होणार..?

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील शेतकरी दत्ताराम कोंडू काळे यांच्या मालकिच्या तीन शेळ्यांचा विद्युत वाहिनीचे धक्का लागून अंत झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे. परंतु या घटनेमुळे वीज वितरण यंत्रणेचा हलगर्जीपणा व बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे अशीच स्थानिकांची प्रतिक्रिया आहे.

काळे हे नेहमीप्रमाणे शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन रानात गेले होते. रविवार दुपारी २ वाजताच्या सुमारास नापणे रेल्वे स्थानक नजीक माळरानावर शेळ्या चरत असताना विद्युत वितरण कंपनीची विद्युत वहिनी तुटून पडली होती. यातच ३ शेळ्या जागीच मरण पावल्या. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी आणि विद्युत वितरण कंपनीचे श्री कानडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील वीजेच्या तुटलेल्या तारा व मुक्या जिवांच्या सुरक्षिततेविषयी गांभीर्याने विचार कधी होणार असाच प्रश्न सध्या जिल्ह्यातील पशूपालक शेतकरी यांना पडत आहे. २ दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातल्या चिंदर माळरानावर अशाच घटनेत एका गायीचा दुर्दैवी अंत झाला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स