कोकणासह मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा ; तापमान ३९ अंशांपर्यंत जायची शक्यता.
ब्युरो न्यूज | पुणे : महाराष्ट्र राज्यातील कोकण आणि मुंबईला पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई आणि कोकणातही तापमान ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर मात्र अवकाळीचे ढग आहेत. उत्तर महाराष्ट्रावर येत्या सोमवारपासून अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांची निगा राखावी असे दुहेरी आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)