बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी:आ.नितेश राणे
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी
उमेश परब /कणकवली : कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत . आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत . वर उल्लेख केलेल्या बैलगाड्या शैर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.त्यांना तातडीने परवानगी द्यावी,अशी मागणी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे आ.नितेश राणे यांनी मागणी केली आहे.
तसेच या कार्यक्रमांना बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो . तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शैर्यतीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी ,असे आ.नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)