भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ख्रिस्ती बांधवांच्या शांतता फेरीत सहभागी होत दिल्या नाताळच्या शुभेच्छा….!
विवेक परब | मुख्य संपादक : नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांकडून येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमीत्त शांतता फेरीचे आयोजन केले जाते. यामध्ये येशुच्या प्रेमाचा आणि शांततेचा संदेश दिला जातो. या माध्यमातून परस्परातील राग, मस्तर विसरला जावा आणि सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे व यातूनच परीसरामध्ये सर्वत्र शांतता नांदेल, हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने फेरीचे आयोजन केले जाते.
वेंगुर्ले भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा- मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली या फेरीत सहभागी होत ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, परबवाडा सरपंच पपु परब, उपसरपंच हेमंत गावडे, माजी सरपंच ईनासीन फर्नांडीस उपस्थित होते.
या फेरीमध्ये शिरील आल्मेडा, निकलस फर्नांडीस, विल्सन फर्नांडीस, दुवाट फर्नांडीस, वाॅल्टर डिसोझा, पारपीट डिसोझा, आना डिसोझा, ग्लॅसीस फर्नांडीस, आल्मेडा इत्यादी ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)