ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धागा…मानवी मनास जोडणारा काव्यानुभव, पुस्तक प्रकाशित…..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

धागा…मानवी मनास जोडणारा काव्यानुभव, पुस्तक प्रकाशित…..!

प्रकाशन: 07 Nov 2022 06:40 PM
वाचन संख्या 36

चिंदर | विवेक परब : मराठी-हिंदी साहित्यातले अनुभवी लेखक, कवी, पत्रकार इकबाल शर्फ मुकादम यांनी लेखनाची ५० वर्षे पूर्ण केली. त्यांच्या अविरत लेखनास साजेसे मराठी काव्य पुस्तक ” धागा ” यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वाशी, नवी मुंबई येथे प्रकाशित झाले.

कोकणातील दाभाेळ (दापोली) येथील प्राध्यापक विचारवंत, मुंबई विद्यापीठाचे सेवानिवृत्त भाषा विभाग प्रमुख अब्दुसत्तार दळवी हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
रउफखतीब(कोमसाप-कार्यकारिणी, खेड) सुधीर कदम-समाज सेवक, राजेंद्र घरत-उपसंपादक-नवेशहर(वाशी), लियाकत खलफे(समाज सेवक), भिकू बारस्कर(कल्याण वाचनालय) आदि मान्यवर ‘बना विचार मंचावर’ आसनस्थ झाले होते. चित्रकार गणेश म्हात्रे हे रायगड जिल्ह्यातील नामवंत कलाकार असून त्यांनी सदर काव्य संग्रहातातील प्रत्येक कवितेला साजेसे रेखाचित्र काढून कवितेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यांत आला.
या वेळी साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी इकबाल मुकादम यांच्या लेखणीस पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यामुळे आपली उपस्थिती लावली व मनस्वी शुभेच्छा दिल्या. खेड, दापोली, दाभोळ, मंडणगड येथूनही बरेच मराठी काव्यप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते.
नवी मुंबई येथील हा साहित्यिक सोहळा निशात मुकादम या त्यांच्या सुविद्य मुलीने घडवून आणला. कोलथरे, पंचनदी येथील कोकणी समाजाची विशेष उपस्थिती जाणवली. तळोजा येथील ऑलिव्ह सोसायटीचे जाणकार पदाधिकारी यांनी इकबाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . सदरच्या कार्यक्रमात उपस्थितांना पुष्प देण्याऐवजी प्रत्येकास एक-एक पेन देण्यांत आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे येथील लेखिका आणि कोमसाप कार्यकारीणी सदस्य डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. तसेच
उपस्थितांचे निशात मुकादम यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स