वृक्षाच्या वेदना जाणून घेण्याची गरज- वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी.
चिंदर सडेवाडी येथे झाडांना लावलेल्या जाहिराती फलकांसह खिळे हटविले..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या, दुकानांच्या, उत्सवांच्या व शिक्षण, क्लास, अशा अनेक प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी झाडांना खिळे मारून माहितीफलक लावण्याचा प्रघात पडला आहे. असे फलक वेगवेगळ्या प्रकारचे खिळे वापरून वड, सावर, गुलमोहर, आंबा, निलगीरी अशा अनेक पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वृक्षांवर मारले जातात. वृक्ष हे जिवंत सजीव आहेत याचा विसर मानवाला पडला आहे असे प्रत्ययास येत आहे.
चिंदर सडेवाडी येथील ग्रामस्थांनी असे खिळे काढून झाडांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एक ते दोन कि.मी अंतरावरच्या झाडानवरुन तब्बल ८० ते ९० खिळे झाडांमधून काढण्यात आले. यावेळी दिलीप गोसावी, प्रतिक मुळये, किरण सावंत, मंगेश गोसावी, श्रेयस सावंत, स्वप्निल गोसावी, पराग मुळये, रोशन गोसावी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
झाडांनाही वेदना व संवेदना असतात हे समजून घेऊन कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी झाडांना खिळे ठोकू नये असे आवाहन वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)