कालपासून 'म्हाळ' सुरु..!
पितृपंधरवडा तथा महालय म्हणजे कोकणवासियांनी पूर्वजांचे तथा पितरांचे केलेले ‘सश्रद्ध पुण्यस्मरण.’
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : गणेशोत्सवाला आलेले काही चाकरमानी आता खास म्हाळासाठी थांबले आहेत. कारण कालपासूनच पितृपंधरवडा (महालय) सुरू झाला. मालवणी भाषेत याला ‘म्हाळ’ असेही बोलले जाते.
या १५ दिवसात गावात कुठे ना कुठे तरी घरात म्हाळाचे (श्राद्ध) जेवण असते. श्राद्ध म्हणजे श्रध्देने केले जाणारे पितरांचे स्मरण. पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या पितृपंधरवद्यात घरात श्राद्ध घातले जाते.ब्राह्मणना बोलऊन विधिवत पिंडदान करून पितरांच्या नावाने जेवणकरी ठेवतात आणि सर्वांना अन्नदान केले जाते. पितृपक्षात पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून या १५ दिवसात पूर्वजांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्धविधी केले जातात. पितरांच्या नावाने पिंडदान, अन्नदान केले जाते. यावेळी जेवणात खूप सारे पदार्थ असतात. वरण – भात, वाटण्याची उसळ, खीर, भोपळ्याची भाजी, बटाट्याची भाजी, सोलकडी, वडे संभारे, भजी असे मिष्टान्न असते. या म्हाळाच्या जेवणाला अगत्यपूर्व गावातील सर्वांना, सगे- सोयरे, नातेवाईक, मित्रांना बोलवले जाते. यावेळी खास करून पितरांच्या नावाने ‘जेवणकारी’ म्हणजेच निमंत्रीत भोजनग्रही ठेवले जातात. त्यानंतर रात्रौ गावातील भजनही ठेवले जाते.
पितृपक्षातील पंधरवडा हा भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतीपदे पर्यंत असतो आणि सर्वपित्री अमावस्येला संपतो. ज्या पितरांचा मृत्युदिन नक्की माहित नसतो त्या सर्व पितरांचे श्राद्ध हे ‘सर्वपित्री अमावस्येला’ करतात. कोरोना काळात कुणी कुणाकडे जात नहोते. मात्र यंदा हे विधी उत्कट भक्तिभावाने आणि श्रध्देने सर्वत्र होणार आजच्या डिजिटल, युगातही ही परंपरा कोकणात तेव्हढीच श्रध्देने सुरू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)