कणकवलीत होणार जन आशीर्वाद यात्रेचं जंगी स्वागत…!
नगराध्यक्ष समीर नलावडे यांची जय्यत तयारी
कणकवली | उमेश परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला १९ आॕगस्टला मुंबईहून सुरुवात झाली. ही यात्रा २५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी व शाही तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरातही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘भूतो ना भविष्य’ असे यात्रेचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. यात्रेच्या निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत असून हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत.
केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणे प्रथमच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यांच्या या दौऱ्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राणेंच्या स्वागतासाठी त्यांनी कंबर कसली आहे. ही यात्रा अविस्मरणीय ठरण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राणेंच्या स्वागताच्या बॅनरनी जिल्ह्यात भाजपमय वातावरण तयार केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)