ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
छोटे दिल से कोई बडा नही होता!

छोटे दिल से कोई बडा नही होता!

प्रकाशन: 19 Aug 2021 11:46 AM
वाचन संख्या 53

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राप्रमुख श्री प्रमोद जठारांचा खासदार विनायक राऊतांना टोला

कणकवली / उमेश परब : स्वातंत्र्यवीर सावरकर, लो.टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय अटलजी, स्व.बाळासाहेब ठाकरे आदी विभूती या कोणा एकाची खाजगी मालकी नसते तर तो राष्ट्राचा जाज्वल्य वारसा असतो. यांच्या स्मृती स्थळांचा वारसा देशातीलच काय तर जगातील कोणीही घेऊ शकतो. शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. वयाने छोटे असले तरी आदित्य ठाकरेंपासून तुम्ही हे शिकण्यासारखे आहे, विनायक राऊत साहेब! छोट्या आदित्य ठाकरेंकडून मोठ्या दिलाची अक्कल शिका. उगाच मनाचा कोतेपणा दाखवून स्व.बाळासाहेबांची उंची कमी करू नका. छोटे दिल से कोई बडा नही होता, एवढं लक्षात घेऊन वाटचाल करा, मग तुमच्याही खासदारकीचा महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होईल असा सल्ला नारायणराव राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊतांना दिला आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे “शिवतीर्थ” आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मनं कोती आणि छोटी झाली आहेत. राजकारणात मतभेद असतातच. जसे ते राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये होते, नारायणराव राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते. पण यांच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते हे आजवर अनेकदा स्पष्ट झालं आहे. शिवतीर्थाला भेट ठरवत नारायणराव राणेंनीही बाळासाहेबांप्रतीचा आदर आणि आपल्या नेक दिलाचे दर्शन घडवले आहे. राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादासाठीच असावे, महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या बाष्कळ बोलघेवडेपणाचे नसावे असा सणसणीत टोला प्रमोद जठार यांनी विनायक राऊतांना लगावला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स