आता भारनियमनाचे 'फायर' नाही…तर मिळाले सुरळीत वीज पुरवठ्याचे 'फ्लाॅवर….!'
हळवल वागदे ग्रामस्थांच्या मागणीला मिळाला महावितरणच्या निर्णयाचा सुखद गारवा..!
कणकवली | प्रतिनिधी : सकाळी ५ ते दुपारी २ व सायंकाळी ७ ते रात्री १२ यावेळेत भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण विभागाने घेतल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. गर्मीच्या दिवसात हा निर्णय घेतल्याने हळवल व वागदे ग्रामस्थानी आक्रमक होत महावितरण कार्यालयावर धडक दिली होती. अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटावे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. पोलीस यंत्रणेने मध्यस्थी करत या प्रकरणावर तोडगा काढून ग्रामस्थांना शांत राहण्यास सांगितले अखेर महावितरण उपभियंता श्री बगडे यांनी आक्रमक ग्रामस्थांना भेट देत भारनियमन होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी श्री बगडे यांचे आभार मानत महावितरण विभागाला लागणारी सर्वोत्तपरी मदत आपण करू मात्र भारनियमन करू नका अशी विनंती केली. अखेर ग्रामस्थांच्या विनंतीला दाद देत उपभियंत्यांनी भारनियमन होणार नाही असा शब्द दिला.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)