पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे आमदार वैभव नाईक यांना निवेदन..
चिंदर | विवेक परब : पळसंब ग्रामपंचायत क्षेत्रातील पळसंब खरी ( ग्रामस्थ भगवान वरक यांच्या शेजारी) असलेल्या शेतीच्या जागेजवळ आहे. पावसाळ्यात वीज ट्रान्सफार्मरची कामे आल्यानंतर वीज कर्मचार्यांना नाईलाजाने त्या जागेत जाऊन दुरुस्तीची कामे करावी लागतात आणि शेतीचे नुकसान होते.
याविषयी पळसंब ग्रामपंचायतचे सरपंच व गावाचे प्रथम नागरीक यांनी वीज कर्मचार्यांचीही सुरक्षितता आणि गावातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ट्रान्सफार्मरची जागा बदलण्याविषयी निवेदन आमदार वैभव नाईक आणि विद्युत कार्यकारी अभियंता,कणकवली यांना दिले आहे.
लवकरच याबाबत आमदार वैभव नाईक कार्यवाही करुन पळसंब ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण करतील असे प्रतिपादन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)