ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
नकोशी आठवडा हॅटट्रीक…! (संपादकीय)

नकोशी आठवडा हॅटट्रीक…! (संपादकीय)

प्रकाशन: 07 Feb 2022 11:36 AM
वाचन संख्या 910

मालवण | संपादकीय : हॅटट्रीक’ या शब्दाला ऐकले की संपूर्ण मनातील विचारांचे अदृश्य अणूरेणू कुठेतरी सुखावून जात असतात.
मराठी मनांनीही गेल्या आठवडाभरात एक हॅटट्रीक अनुभवली आहे आणि ती हॅटट्रीक अनुभवताना मनाचा प्रत्येक अदृश्य अणूरेणू मात्र आसवांच्या श्रृंखलमध्ये रुपांतरीत होतोय….तेही दृश्य स्वरुपात.

२ फेब्रुवारीपासून सुरु झालेली ही दुःखद श्रृंखला आज ७ फेब्रुवारीला हॅटट्रीक बनणे ही खरेच महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला आणि खासकरुन कला तथा सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांना नकोशी झालेलीच गोष्ट ठरली आहे.
आधी चतुरस्त्र अभिनेते श्री रमेश देव यांच्या निधनाची वार्ता मराठी मनाला ऐकून धक्का बसला होताच तोवर दिनांक ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांचे देहावसान ही बातमी मराठी मनाला अक्षरशः पिळवटून टाकणारी अशीच होती आणि तो दिवस मावळून दिनांक ७ फेब्रुवारी नीटसा उगवलाही नाही तोपर्यंत कोकणचे दशावतारी लोककलावंत व नटसम्राट सुधीर कलिंगण यांनी जगाला निरोप देऊन पुढील प्रयोगासाठी अनंताच्या रस्त्याकडे मार्गाक्रमण करत देह ठेवल्याची वार्ता आली…!
कला क्षेत्रातील तीन सर्वोच्च परिपक्व आणि ठहराव असलेली व्यक्तिमत्वे केवळ पाच दिवसांच्या कालावधीत रसिकांचा राम राम घेत कुठेतरी निघून जायची ही नकोशी साप्ताहीक हॅटट्रीकच म्हणावी लागेल..!
अश्रू सुकतात….काळ फुंकर घालतो अशा अनेक समजुतींना छेद देणारा असाच हा आठवडा…! दिग्गज कलावंतांच्या जाण्याने न भरुन येणारी सांस्कृतिक हानी होते हे खरेच आहे परंतु त्यांच्या असण्याने काळाच्या पुढे जात जात समाज ,रसिक,चाहते यांच्या वाढलेल्या सांस्कृतिक समृद्धीच्या श्रीमंतीचे हिशेब कुठल्याच वहीत मावणारे नसतात याची जाणीव होत होत एकेक कृतज्ञ अश्रू भल्याभल्यांना छोटे मूल बनवून सोडतो.
आता या हॅटट्रीकनंतर अवघ्या महाराष्ट्राला ‘मुंबई’ बनावे लागेल.
इच्छा नसूनही जीवनरहाटीची धकाधक सुरु ठेवताना पुन्हा एक उसने स्फुरण आणावे लागणार आहे….वेळ नाहीय यापेक्षा काळही नकारात्मकतेमध्येच घुटमळतोय म्हणून समस्त मराठी मनांना ‘मुंबई’ बनून स्वतःला जागे ठेवावे लागेल.
कोरोना काळानेही जितकी सलग मानसिक क्षती केली नसेल त्यापेक्षा कितीतरी जलद अशी मनोविदारक अवस्था या आठवड्याने दिली आहे.
तीनही सर्वोच्च व्यक्तिसंस्थांना सद्गती लाभो हीच भावना प्रत्येक मराठी मनाची आहे आणि सोबतच काळाने अशा नकोशा हॅटट्रीकची पुनरावृत्ती करु नये हीच आशेची प्रार्थना मराठी रसिक करत आहेत.

सुयोग पंडित. (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स