तानाजी राणे यांचे निधन
कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली तालुक्यातील वाघेरी ,माळवाडी येथील मूळ रहिवासी व जानवली येथे सध्या वास्तव्यास असलेले तानाजी उर्फ नाना बाबू राणे( वय ५०) यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले.
ऑटोमोबॉईल व्यवसायात कार्यरत असलेल्या तानाजी राणे यांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,मुंबई परिसरात मोठा मित्रपरिवार होता. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजमनावर आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनाने कणकवलीसह वाघेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, विहिनी ,पुतण्या असा परिवार आहे. पत्रकार सुधीर राणे यांचे ते मावस बंधू होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)