पत्रकार विष्णू धावडे यांचा मुंबईत १३ डिसेंबर रोजी पुरस्कार सन्मान.
पत्रकार विष्णू धावडे यांचा मुंबईत १३ डिसेंबर रोजी पुरस्कार सन्मान.
आचरा | ब्यूरो न्यूज : देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच 'कोकण रत्न पदवी' पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा केली आहे अशी माहिती मिळत आहे. विष्णू धावडे यांना हा पुरस्कार शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि मुख्य सल्लागार दिलीप लाड कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विष्णू धावडे हे व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.
श्री. धावडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून २० सप्टेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम जाहीर.
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.