ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
नवीन पाणी, झुळझुळवाणी ..नव्या युगाची गाती गाणी ; श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचा उन्हाळी शेती उन्नतीचा उपक्रम.

नवीन पाणी, झुळझुळवाणी ..नव्या युगाची गाती गाणी ; श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांचा उन्हाळी शेती उन्नतीचा उपक्रम.

प्रकाशन: 08 Dec 2023 11:17 PM
वाचन संख्या 490

वैशाली पंडित | मुख्य संपादक : ‘नवीन पाणी झुळझुळ वाणी हे आजपासून ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक सकारात्मक कृषी मानसीकता समजावणारे शालेय गीत होते.’ काळानुरुप ‘पाणी, शेती व माणुस ‘ अशी विचित्र गल्लत झाली आणि वैश्विक उष्णता सारख्या समस्यांना तोंड देताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘नवीन पाणी झुळझुळ वाणी’ गीताचे महत्व जितके अपेक्षित तितके क्रियेत घडू शकले नाही परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांना उन्हाळी पाणी, शेती व पृथ्वीचे भविष्य याची जाणीव झाली. शेती ही शाब्दिक अलंकाराचे तत्व आहे परंतु शेती करणे , तिचा विचार करणे किंवा शेतकरी बनवण्यासाठी कुठलीच अलंकारीकता ही उपयोगी नसते तिथे कष्टाची ताकद, मातीचा प्रचंड अभ्यास व इच्छा शक्ती लागते.

,
पळसंब गावातील ‘शेतीची उन्नती’ डोळ्यासमोर ठेऊन स्थापन झालेले श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ,गावपातळीवर शेतीचा नवा उपक्रम राबवत असून त्याची सुरूवात वायंगण (गावठाण)येथून करण्यात येत आहे. याची तयारी म्हणून शेतीसाठी सर्वाच महत्वाचे असणारे पाणी नियोजन करण्यासाठी मंडळाचे सभासद उपस्थित होते.या सर्व सदस्यांनी श्रमदान करून धरण बांधण्याचे काम पूर्णत्वाला नेले.आता या पाण्याचा वापर उन्हाळी शेतीसाठी करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमी होत चाललेली उन्हाळी शेती पाहता पळसंब गावात हीच शेती नव्याने फुलवण्याचे ध्येय श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाने उराशी बाळगले आहे.या श्रमदान संघात मंडळाचे कृतीशील अध्यक्ष उल्हास सावंत ,अमरेश पुजारे, चंद्रकांत गोलतकर ,शेखर पुजारे , रमेश मुणगेकर , वैभव परब ,गुरु परब , ऋतिक पुजारे , संतोष परब, प्रमोद पुजारे, नितिन सावंत सहभागी झाले होते.

‘उद्या नदीला बांध घालुनी कोणी कालवा दिला काढुनी’ या त्याच कवितेतील ओळींकडे भविष्यातील प्रत्येक पळसंब् बालक बालिका बघतील व धन्यतेने श्री जयंतीदेवीसांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांतील प्रत्येक सदस्याचे आभार व्यक्त करतील…कारण ‘उलेलं बी व फुलेल पान..तुरा पिकांचा फुलवील उन्हाळ्यातही हिरवं रान….शेतीचे.!’

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स